सारंग
मी सकाळी समुद्रावर गेलो,
तो खुप खवळला होता,
रात्रीचा नजरा मला सकाळी दाखवत होता.
मला म्हटला का आलास ?
मी म्हटलं तुला भेटायला,
तुझ्या खाऱ्यापाण्याची चव चाखायला.
तो म्हटला आला तसा माघारी जा !
अगोदर निर्मळ झरा बनुन खडकाळ भागात वहा,
मग माझ्या पाण्याची चव पहा.
मी म्हटलं तिकडे निर्मळ काहीच राहीलं नाही,
मानुस मानसालाच काळ्या पाण्यात पाही,
म्हणुन आलो तुझ्या ठायी.
तो परत म्हटला, अरे इथं असं का येता येतं,
खुप दिव्य पार करावं लागतं,
मग हे खारं पाणि ही काही तरी देतं.
मी म्हटलं नको दावू चव
तुझी ,
पण काय सामावलंय आत ते सांग,
मानसाने जगावं कसं ते सांग.
तो शेवटी म्हटला मन् अथांग ठेवा माझ्या सारखं,
मग त्यात सारं काही सामावेल,
स्वछंद खेळणारे आनंदाचे मोती,
दुःखीत शिंपले ज्यांनी त्यागलेय मोती,
हळुच निसटणारे वाळुचे कण,
दुःखात ही हसणारं मोठं मन्,
आकाशात जाणारे गोड वारे,
खालि राहणारे क्षार खारे,
त्यानं खुप काही सांगितलं,
मला त्याचा शब्द अन शब्द पटला,
आज माझ्या ताई मध्ये मला सारंग भेटला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें