( ही रचना कोणत्याही व्यक्तिच्या स्वभावाला गृहीत धरुन केली नाही. किंवा ह्या रचनेचा इथं काही संबंध नाही. असं आढल्यास हा योगायोग समजावा अन शक्य झालं तर आपापसात प्रेम भाव वाढवावा, प्रत्येक जन आपल्याच हिश्याचं खातो. हिसकावत कधीच नसतो....)
दुरावा
तोडीस तोड देनारा भेटला
कि लोक ईग्नोर करु लागतात
कुणी जरी वागत असला प्रेमानं
का कुणास ठाऊक लोक त्याला टाळू लागतात
भीति तर वाटेत नसेल ना? त्यांना
त्याची मनातल्यामनात
कदाचित देईल एक दिवस
हा आपल्यालाच मात
अहो त्याच्या जवळचं कौशल्य
त्याच्या कडेच असतं
आपण ईग्नोर केलं
तरी सुद्धा ते दिसतंच
तो जवळीक करु पाहतो
पण ते दूरदूर पळतात
त्यांच्या यशानेच ते
मनोमन का ? बरं जळतात
अशी विलक्षण स्थिति
प्रत्येक क्षेत्रात सुरु असते
आणि आत्मकेंद्रीत केली
तर ती आपलीच भासते
©शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें