कवि कुसुमाग्रजांची कणा ही कविता खुप अप्रतिम ……
तिला सलाम 🙏🏼 म्हणुन आणि कवि कुसुमाग्रजांची माफी मागून कणाचं बिडंबन सादर करत आहे.
आपल्याला नक्की आवडेल ही आशा………
बघितलंत का रे त्यांना
दारात आले कोणी,
पोट होते भरलेले
एका त्यांची कहानी.
भरपुर फिरलीत
खूप खूप चरलीत,
आलीत विदेशी जाऊन,
केलेत गबर व्यावसायी
बस गेले शेतकरी राहून.
बापाचा माल समजून
वेळे आधीच माजली,
जाळून काया जनतेची
स्वतःची कणसे मात्र भाजली.
महागाई वाढवली
दांडगाई चालवली
कर्जापोटी गुरं सुद्धा नेली,
फास घेण्यासाठी त्यांनी
कासरे मात्र ठेवली.
मित्रांना घेऊन संगे
सारवा सारव करता आहे,
कधी गावात कधी शहरात
सगळीकडे हरता आहे.
झाडू कडे हात जाईल
तोवर एकेक मग निसटला,
मारु नका लोकहो आम्हा
जरा तोल आमचा सुटला.
जर टिकून राहीलो इथं
तर तोडू तुमचा कणा,
"अजून लूट बाकि आहे"
हा असेल आमचा बाणा.
©शिवा चौधरी(प्रहार)
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें