शेतकरी आणि दिवाळी
धीन धीन दिवाळी
गाई-म्हशी ओवाळी
कुठं गेल्या गाई-म्हशी,
शेतकरी पडे तोंड घशी
भर दिवाळीच्या दिवशी………
खिशात नसताना नाना
चार पणत्या लावतो
दुष्काळापायी गाई-म्हशी तो विकतो,
केविलवाण्या चेहऱ्याने
बळि राजाला शोधतो………
ईळा-पिळा जाऊ दे
बळीचे राज्य येवू दे
हे तर जुमलेच झाले,
कुणी स्वार्थी साठी तेव्हा
बळीराज्याला मारले………
पाप कर्म योनीतून
गल्लोगल्ली आज मात्र
स्वार्थी ईथं जन्मास आले,
माझ्या बळीच्या पाठीमागे
किती शेतकरी मेले………
तिळ तिळ तुटूनीया
महागाईच्या सावटी
रोज जगतो मरणं,
त्याचं वस्त्रहरण करी
सावकारी दु:शासन………
राज्य पुन्हा बळीचं येवोनी
फुलूनीया माळ सारा
पोर जाईल सासरि,
तेव्हा खरी ती दिवाळी
माझी होईल साजरी………
© शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें