श्याम
साने गुरुजींच्या कथेतला श्याम
दिसेनासा होत चाललाय
आजच्या धावपळिच्या युगात
संस्कृति विसरत चाललाय
पुर्वी घोळक्यात जमायचे सारे
आता चॅटचा घोळका होतोय
तेव्हा कट्टी नंतर बट्टी व्हायची
आता रिमूव होताच नवा गृप बनतोय
हळूहळू आईचे संस्कार विरताय
विसरली जातेय बाबांची शिकवण
आजोबा सोबत खेळत नाही कुणी
आज्जीच्या गोष्टीची येईना आठवण
ताई भावास धपाटा घालत नाही
भाऊ ही तिची वेणी ओढत नाही
सर्वच खोल्यांची दारे झाली बंद
कुणी कुणासाठी कडी काढत नाही
जागतिकिकरण होतय भाकरीचं
चिऊ-काऊचा घास कसा मिळेल
आणि आईच गेली सायबर कॅफेत
मग आता श्याम तरी कसा मिळेल
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें