#सैनिक_एक_वेदना
तुम्ही म्हणताय आई प्रमाणे निस्सिम प्रेम आहे माझं या धरतीवर......
पण मला तर पोकळ देशभक्तीचं अवडंबर वाटतयं,
कारण कुणी ही पहा कामं कमी पण श्रेयच जास्त लाटतयं.
अरे खरं प्रेम होतं आम्हा विरांचं या धरेवरती....
तेव्हा किती पडले होते धारातिर्थी,
आम्ही वाहत नाही बसलो अश्रू त्या शवांवरती.
मरगळ झटकली, आसवं पुसली, त्यांच्याच बंदूकितली काडतूसं घेतली,
डोळ्यात आसवां ऐवजी त्यांच्या रक्ताचा गरमागरम गुब्बार घेऊन पुन्हा लागलो लढायला.....
कारण तेव्हा वेळ नव्हता ना रे आमच्याकडे त्यांच्या शवावर दोन अश्रू ढाळायला.
युद्ध जिंकलं गड्या.....
पण स्वस्थ बसू देईना म्हातारे आई बाप, लहान लेकरं,
अरे इतकंच काय स्वस्थ बसू देईना तिचं पांढरं फट्ट कपाळ,
अन् तिच्या गर्भातलं इवलसं बाळ.
कसं जगावं तिनं ?
आणि कसं जगवावं त्याला?
काटेरी नजरांच्या जंगलात कसे बहरेल ते कोवळं पिंपळपान....
अन वासनांध मेंढरांच्या कळपात कसं जपाव ते कोकरु छान.
भगत सिंह, राजगुरू, सुखदेव, विसर पडला का रे साऱ्यांचा,
चौकीचौरा, जालियन वाल्या बागेतल्या गोळीबारांचा,
आज ही तेच चित्र दिसतय.....
काल इंग्रजी हुकूमत होती
आज आपलेच आपल्याला मारताय...
राजकारणाच्या ढोहात नुसती वंशवादाची नौका तारताय
परिस्थिती बदलेल या आशेवर डोळे मिटले रे आम्ही,
अन् सत्तरवर्षाच्या कारकिर्दीत चक्क आईलाच लुटले तुम्ही !
शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें