बुधवार, 9 सितंबर 2020

आत्महत्या, का व कुणासाठी ?

आत्महत्या, का व कुणासाठी?

             मित्रांनो आपल्या आजूबाजूला बघा किंवा सर्व देशात रोज नव्याने कुणी तरी आणि कोठे तरी आत्महत्या केल्याचे आपल्याला ऐकायला मिळते. काही जण एखाद्याच्या हतबल परिस्थितीचं वर्णन करत, त्याच्या त्या कृत्याला नकळत दुजोरा देतात. कुणी कोसतं तर कुणी दुसऱ्याच एखाद्या आत्महत्त्येवर राजकारण तापवतो. कुणी टिंगल टवाळी करतो. इत्यादी इत्यादी.......
             पण मुळात आपल्या मनात हा विचार येतोच कसा? आता एखादा जण म्हणेलही तुझ्यावर पाळी आली की कळेल ! काय कळेल हे ही स्पष्टीकरण त्याने पूर्ण लेख वाचल्यावर द्यावं. त्याच्या समीक्षेचं स्वागतच असेल. परवा तेरावाच्या सिनेमा नटाच्या आत्महत्येला सुरवातीला हळहळ व्यक्त करणारे आता विपरीत बोलू लागलेत. प्रसार माध्यमातून ही आत्महत्या नसून एखादा महोत्सव असल्या सारखं वातावरण निर्माण केलं जातंय. अर्थात ते टि आर पी साठी हा खेळ वर्षानुवर्षे खेळत आले आहेत यात शंका नाही. आणि ते ही तो खेळ ठराविक ठिकाणीच करतात म्हणा. अन्यथा किती तरी शेतकरी बांधावर लटकतात, किती तरी कामगार आढयाला तर कुणी पंख्याला तर कुणी विषाचे डबेच्या डबे रिते केले. माझ्या निरीक्षणानुसार तरी कणखर व्यक्ती कधी आत्महत्या करीत असल्याचे मला दिसलं नाही. केली ही असेल तर ते ही हतबल होऊन. पण ही हतबलता याच एका गोष्टीतून का जगासमोर आणायची का?  कुणी दिला आपल्याला तो अधिकार? मुळात या देहावर आपला अधिकार नाहीच. आपल्या जन्मासाठी आपल्या आई बाबांनी खाल्लेल्या खस्ता, केलेले नवस, आपलं पोटाचं खडगं भरण्यासाठी स्वतःच रिकामं ठेवलेलं पोट काही काही का नाही आठवत हो?
मी म्हणतो का? आणि कशासाठी? 
हतबल झालात का? कंटाळा आला का? आला ही असेल असं आपण मानू. पण कुणा एकाचा किंवा एखादया परिवाराचा किंवा समुदायाचा, अन्यथा सरकारी यंत्रणेचा वगैरे वगैरे... म्हणून संपूर्ण जगाचा तर नाही ना आला. मग असा विचार करण्या आधी त्या उरलेल्या जगात शिरून तर बघा एकदा ! माझ्या ओळखीत साधारण वीस बावीस वर्षाआधी एकाने अनेक वेळा वेगवेगळ्या जागेवर जात, आत्महत्येचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी आपल्या जाण्यानंतर इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली. पण शेवटी स्वतःच्या घरात त्यानं जीवन संपवलं. त्यानं ते संपवलं यातही चूक आहेच यात शंका नाही. काहींनी उगाच नाटकं ही केलीत. काही याच नाटकात जीव गमावून बसले तर काही तारले गेले. 
असो आपला मुद्दा असा आहे की खरंच हा शेवटचा मार्ग आहे का? तर नाही ! जर हे आयुष्य किंवा हा देह आपला नाहीच तर त्याला संपवण्याचा अधिकार ही आपला नाही. पटतंय ना? की जातंय डोक्यावरून……
तुमच्या आयुष्यात काही घडलं आणि झालात का नाराज? आलाय का राग? परिस्थिती हाताबाहेर गेली का? मग ते हात झटकून टाका. नव्या उमेदीनेनवं काही सुरू करा. घर सोडा, गाव सोडा, देश सोडा. पण जग सोडू नका. आयुष्य संपवून टाकू नका. ज्याच्या मुळे त्रासला आहात त्यांनाच सोडा. अहो त्यांची लायकी नाही तुमच्या सोबत राहण्याची. करा वाटा वेगवेगळ्या आपल्या, स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज व्हा. आपली जीवनशैली बदलवा. बदल घडला तर परिस्थिती बदलेल. आयुष्य पुन्हा रुळावर येईल. आपल्या नंतर आपल्या आवडत्या व्यक्तींचं काय होईल यावर मंथन करा. आत्महत्येचा विचार कापुराप्रमाणे हवेत विरून गेला नाही तर सांगा. अहो एकदा मनात हिमतीची ज्वाला पेटवा तर खरं.
पण कठीण पर्याय कुणालाच नको सगळ्यांना कसं सोप्प पाहिजे. संपवा जीवन म्हणजे झालं. लाज वाटायला हवी आपल्याला असा विचार करताना सुद्धा. थोडं खरखरीत बोलतोय खरा पण त्यातून मला काहीच मिळणार नाहीये. तुम्ही जगलात तर माझ्या घरात राशी रिकाम्या थोड्याच करणार आहात. मला मिळेल ते आत्मिक समाधान तुम्हाला या सुंदर जगाचा निरोप न घेऊ देण्याचं. या आधी मी असे प्रयत्न प्रॅक्टिकली करून पाहिले आणि आणि ते सफल ही झालेत. मस्त जगताय हो ते... त्यांचं आनंदी जग बघून त्यांच्या पेक्षा जास्त आनंद मला होतो. असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून आज हा लेखन प्रपंच..... तसं लिहायला खूप आहे पण लेख जास्त मोठा झाला तर वाचक ही बोर होतात. म्हणून थांबतोय पण यावर जमलं तर चर्चा सुरू ठेवू. मी दोघा तिघांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही दोघा तिघांचं मनोबल वाढवा. 
"आयुष्य खूप सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवू या....!"

लेखन :- वास्तव 8275493221

सोमवार, 8 जुलाई 2019

हिंदी अभंग

*_हिंदी अभंग_*

बता दे    ईश्वर
बता मेरे अल्ला
कैसे होगा भला
इंसानो का....

कोई पढे  वेदं
कोई तो कुराण
फिर भी विराण
बुद्धी लागे.....

किसीं हात झेंडा
किसीं हात दंडा
राजनीती फंडा
जाने ना वो....

पताकों का रंग
यहा निला पिला
देह   पर  चोला
काके हरा...

चाल चले कोई
कटे मरे कोई
बदनामी भये
पताकों की.....

बता  मेरे    राम
कैसा यह  खेला
विषैली  ये बेला
बोये कौन ?.....

*_- वास्तव_*

गुरुवार, 2 अगस्त 2018

हम भारत माँ के सपूत हैं।

हम भारत माँ के सपूत हैं।

जो हाथ बढ़ाएगा, वह मुंह की खायेगा ।
हम भारत वासी को , जो आँख दिखायेगा
कितनी जान है इस दिल मे , उस वक्त दिखलाऊंगा,
तेरी जमीं पर आकर , सबक तुम्हे सिखलाऊंगा
हो चीन तुम पाकिस्तान, हो दहशत गर्दो की जान
हम उन्हें ना बख्शेंगे जो मुल्क हो बेईमान.....
हम उनके लिए यमदूत है , हम भारत माँ के सपूत हैं।  || धृ ||

तिरंगे की शान बचाने, खून हमने संजोया है ।
भगतसिंह, सुखदेव , (राज)गुरूसा, वीर यहाँ पर पाया है
इसांनो के कदर के खातिर भले ही आंसू बहते है,
देश की लाज बचाने वाले,गुंडे दिलों में रहते हैं।
जिन हांथो में सजी चूड़ियाँ बंदूके भी वही संभाले है,
नन्हे मुन्हे शेर भी हमारे,तपती आग के गोले है।
इन गोलों से टकराने से समझो तुम्हारी भभूत है,
हम भारत माँ के सपूत हैं।हम भारत माँ के सपूत हैं। - १

हिन्दू मुस्लिम शिख ईसाई, धर्म मिलेंगे अनेक यहाँ,
देश के खातिर मरमिटने वाला जज्बा मिलेगा एक यहां।
निकल पड़े जब जीत के खातिर,पता ना हमको साहिल का...
हड्डियों में भरा है बारूद न डर दिखलाओ मिसाइल का!
समझौतों से समजाया पर अकल तुम्हारी ज़ीरो हैं,
झांक के देखो इतिहास हमारा अब्दुल हमीद यहाँ हीरो है।
नाकाम तुम्हे कर देगी ऎसी पौलादी छाती हम रखते है,
शांति के संदेश दिलाने वाली ख्याति भी हम रखते हैं।
कही गरम तो कही नरमिया ऎसा हमरा वजूद हैं....
हम भारत माँ के सपूत हैं।हम भारत माँ के सपूत हैं। - २

हर हर महादेव की गूंज उठेगी मरहाटों के ओंठो से
उतनी भारी आवाज़ न आ पायेगी तुम्हारी तोफों से
अग्नी पृथ्वी मिसाइलें बना गया हिंदुस्तां का मुसलमां था
भारत देश था प्यारा उनको जितना प्याराउन्हें  कलमा था
दक्षिण में है जलपोत हमारे पूरब में गोरखा बैठा है,
सिखों की गर्जना सुन सुन उत्तर में हिमालय ऐंठा है।
हर धरम के हर जाति के शेर यहाँ मौजूद है...
हम भारत माँ के सपूत हैं।हम भारत माँ के सपूत हैं। - ३

प्रार्थना

*प्रार्थना*

दे जिजाऊ मजला दे सावित्री मजला,
दे बुद्धी दे मजला दे बुद्धी दे सकला || धृ ||

ज्ञाना शिवाय येथे, कुठलाच वाव नाही
अज्ञानास या जगती, कसलाच भाव नाही
जे कळले गं मजला, ते कळू दे तू सकला
दे बुद्धी दे मजला दे बुद्धी दे सकला……१

जात धर्म पंथा, इथं नसावाच थारा
पेरीत मानवता सांगू एक धर्म सारा
शिकण्यासाठी येथे नसे भेदभाव कसला
दे बुद्धी दे मजला दे बुद्धी दे सकला......२

रंजल्या गांजल्याशी आम्ही संगतीस घेऊ
या अखंड देशाला चला रंग एक देऊ
आंबेडकर फुले शाहू, असो ध्यास अमुचा असला
दे बुद्धी दे मजला दे बुद्धी दे सकला......३

न नरास देणार ना नारीस देणार
ना तृतीय पंथास उगा त्रास ना देणारं
मना मनात साऱ्यांच्या भाव रुजू दे गं असला
दे बुद्धी दे मजला दे बुद्धी दे सकला......४

आई बाबा संगतीनं, मान गुरूंचा ही राखू
सखी सवंगडया संगे,फळ ज्ञानाचे हे चाखू
सांगतो शिवा सकला, जो शिकला तो टिकला
दे बुद्धी दे मजला दे बुद्धी दे सकला……५

रचनाकार/गीतकार
🖊शिवदास चौधरी
(कळमसरेकर)
जामनेर,जळगांव
८२७५४९३२२१

©या प्रार्थनेचे सर्वाधिकार गीतकाराने राखून ठेवले आहेत.आपण आपल्या शाळेत कुठला ही बदल न करता ही प्रार्थना लागू करू शकता हा अधिकार मात्र गीतकार आपणास स्वखुशीने देत आहे.

रविवार, 8 जुलाई 2018

अप्रूप

अप्रूप

शेंडा  जाई   दिगंतरी
मुळं मातीच्या अंतरी
धरेवीन   हर्ष   कुणा
नसेल   या   भुईवरी

किती मातीला अप्रूप
कसं सांगेल ती माती
तिच्या हर्षाचाच पान्हा
देई झाडाला त्या गती.

पान्हा मायेचा पिऊनी
त्याची उंचाविता मान
त्याच्या उंच या झेपेचा
मातीस त्या अभिमान

शिवा सांगीतो अनिला
तुझा धरिला मी धागा
तुझ्या प्रश्नाच्या उत्तरा
दिली कवितेत  जागा

तुही झाड आम्हासाठी
आम्ही तुझीच ती माती
सांगू    मनाचे   अप्रूप
तुझी वाढतांना  कीर्ती

शिवा चौधरी
८२७५४९३२२१

मंगलवार, 12 जून 2018

ठुमरी

ठुमरी

तुझ्यावरी प्रेम मी शतदा करावे ।
रातभर चांदण्यांनी बघूनी झुरावे ।।

तुझ्या आठवात शहारते अंग
तुझ्या पिरतीचा चढताच रंग
मन बावरे हे प्रीतीत झुरावे
तुझ्यावरी प्रेम मी शतदा करावे ।

तुझ्या अंतरीची वाट कुठे शोधू
पिरतीच्या सावजा सांग कसे वेधू
नजरेच्या घावाने हृदय पोखरावे
तुझ्यावरी प्रेम मी शतदा करावे ।

तुला भेटण्याला आतुरले सारे
मज सवे फुलपाने चंद्र आणि तारे
तुज भेटी अंती गगनी विचरावे
तुझ्यावरी प्रेम मी शतदा करावे ।

तुझ्या कुंकवाचा रंग लेऊनिया
तुझा अंश माझ्या कुशी घेऊनिया
वाटे मनाला स्वच्छंदी वावरावे
तुझ्यावरी प्रेम मी शतदा करावे ।

शुक्रवार, 8 जून 2018

आपलं गाव आणि आपली माणसं

आपलं गाव आणि आपली माणसं

आपलं गाव आणि आपली माणसं
यांची कर्तबगारी पाहूया,
चला कळमसरे गावाची
आज ओळख करून घेऊया ।।धृ ।।

गावासाठी दादा भाऊ नाना आप्पा
झटलेले मी पाहिले आहे
पौष पौर्णिमेच्या यात्रेत मी
गाव नटलेले हे पहिले आले
जय अंबे जय भवानी जय च्या जयघोषात
बायका माणसं रंगून जातात
यात्रा जरी छोटी आमची
त्यात लहान थोर दंगून जातात
कुस्त्यांची दंगल येथे
न चुकता बघता येईल
आणि खरं जीवन आनंदानं
त्या दोनच दिवसात जगता येईल
हा आनंद उपभोगण्या साठी
एकदा पुन्हा लहान होऊया.....  ।। १ । ।

हिंदूंची दिवाळी गावात
मुस्लिम ही साजरी करतो
आणि रमजान चा शिरखुर्मा
हिंदू ही आनंदानं खातो
न्हावी धोबी तेली कुणबी
बारा बलुते येथे वास करतात
अहो गाव गाव राज्य सोडा
इथली माणसं जगाचाही प्रवास करतात
एक दिवस सपूत इथला
मंगळावर ही यान सोडेल
आणि कळमसरे गावचं नाव
गिनीज बुकात ही जोडेल
आपल्या गावाचा लौकिक
साऱ्या जगालाच दावूया.....।। २ ।।

आर्मी, नेव्ही, बी एस एफ , सी आर पी
अहो शिक्षकांचा तर बोलबालाच आहे
शिपाया पासून फौजदारा पर्यंत
आमचा ही खाकी वाला आहे
कुणी वकील कुणी इंजिनियर
कुणी एम पी एस सी चा पल्ला गाठतोय
कुणी पोरांच्या भविष्यासाठी
रात्रंदिवस मातीत झटतोय
मला वाटतं पोरांनी ही
स्वप्न मोठी मोठी पाहायला हवी
आपापसातल्या दुराव्या ला
मूठ माती द्यायला हवी
गावासाठी मिळून सारे
योगदान काही देऊया.....।। ३ ।।

नावाजलेला बोरसे आंबा
मी सुद्धा पहिला नाही
काठोकाठ भरून वाहणाऱ्या सोनदला
आज थेंब सुद्धा राहिला नाही
पाण्यासाठी गाव आपलं
सारं वणवण भटकतय
प्रगतीचं चक्र गावाचं
गड्या कुठं तरी अटकतय
वृक्ष लागवड जल संवर्धणाचा ध्यास
आता आपल्यालाच घ्यावा लागेल
कागदावरच्या योजनांना
कृतीत न्याय द्यावा लागेल
भविष्यातील धोका टाळायला
आताच सजग राहूया.....।। ४ ।।

वारकरी संप्रदायाचा  गाव आपला
विज्ञानात ही पुढे जातोय
जवाहर वाचनालयाच्या माध्यमातून
वाचन संस्कृती पुढे नेतोय
कुणी कवी कुणी लेखक
कुणी वेगळीच कला जोपासतोय
कुणी कुणी डॉक्टर होऊन
रुग्णांना ही तपासतोय
छोट्या मोठ्या व्यवसायात ही
पोरं आमची पुढं जाताय
कष्टाचीच कमावताय
आणि कष्टाचीच खाताय
ताठ कणा अन् कणखर बाणा
जपून आपला ठेवूया..... ।। ५ ।।

कवी शिवा एम.चौधरी
कळमसरे ता. पाचोरा
८२७५४९३२२१